१९५७ पूर्वीचे भिल्ल व कोळी प्रमुख उठाव .

Header Ads Widget

१९५७ पूर्वीचे भिल्ल व कोळी प्रमुख उठाव .

 १९५७ पूर्वीचे प्रमुख उठाव .

भिल्लांचा उठाव ;
https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/10/1857purvichebhillkoliuthaw.html
bhartiyadiwasi.blogspot.com

  • भिल्ल हे राजस्थान आणि गुजरात मधील मुख्य राह्वासी मानले जाते आणि तेथील जमिनीचे मालक होते .भिल्लांची मुख्य वस्ती सातपुडा व सह्याद्रीच्या पर्वतात होती .खानदेशातील भिल्लांची त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणावर होती .
  • १८०३ साली भिल्लांनी खानदेशात लुटमार केली कारण त्यांना उत्तर मराठेशाहीतील अराजकतेचा फायदा उचलायचा होता.
  • साल १८१६ ला भिल्लांनी परत उठाव केला कारण यावेळी त्यांना पेंढारी लोकांनी पाठिंबा दिला होता. 
  • पेशवाई च्या अंता नंतर खानदेश ब्रिटीश सरकारकडे आले .खानदेश चा कारभार ब्रिक्स या अधिकार्याकडे सोपविण्यात आला .तेथील सर्व परिस्थिती आढावा  घेऊन टोळी प्रमुखांना जाहीगरी परत करण्याचा निर्णय ब्रिक्स व एलीफिस्टन याने घेतला .
  • हिरा नावाच्या 'भिल्ल ' नेत्यांच्या नेतृत्वाखाली खाली ई.स  १८२२ साली पुन्हा बंद झाले .हिरा भिल्लाने खानदेशातील ब्रिटीश शासन जवळजवळ संपुष्टात आणले होते .कर्नल रोबिंस्न्सला भिलाचा बंदोबस्त करण्यास पाठवले .त्याने दोन वर्ष प्रयत्न करून भिल्ल टोळ्यांचा बंदोबस्त  करण्यात यश मिळवले .
  • सेवाराम घिसाडी च्या नेतृत्वाखाली भिल्लांनी ई.स.१८२५ या सालात पुन्हा उठाव केला .इंग्र्जाकडील अंतापूर शहर लुटले .ले ओट्रोमनला सेवाराम ला पकडण्यासाठी पाठीवले त्याने सेवारामला पकडले आणि माफही केले .
  • ई .स.१८३९ मध्ये खानदेशात तडवी भिल्लांनी उठाव केला .
  • ई.स.१८४६ मध्ये ''जीवे वासवा''याने इंग्र्जाशी संघर्ष सुरु केला .तो पकडला गेला त्याला प्रदीर्घ  कारावासाची शिक्षा देण्यात आली .
कोळ्यांचा उठाव ;
  • भिल्ल   व रामोशी   यांची   इंग्रज  शासन  प्रणालीमुळे  हलाकीची परिस्थिती निर्माण  झालेली  होती   अशीच   परिस्थिती नंतर  कोळी   या जमतीवारही आली  व त्यांनीही  आपले  मुलभूत प्रश्न  सोडवण्यासाठी  उठ्वाचे  हत्यार  उचलले  .
  • रामजी  भांगडिया  यांच्या नेतृत्वाखाली  ई  स  १८२८ मध्ये  उठाव सुरु झाला  .दोन  वर्षापर्यंत  हा लढा  असाच  चलू राहिला .इंग्रज अधिकारी  ''अलेक्झांडर  म्याकिनस्तोषं   '' याने कोळ्यांचे  बंद मोडून  काढण्यात यश मिळवले .
  • ई.स  १८४४  ला   रघु  व   बापू   भांगरे   यांचा   उठाव   गाजला  .   पुण्यातील   सरकारी   खजिने   सरकारी   कार्यालये   यांचावर   हल्ले   करण्यात आले   ई  .स १८४५  ला   कोळ्यांनी   रामोश्यांची   मदत  घेतली   .ई .स   १८४४ ला   इंग्रज  अधिकार्याने   रघु   या   क्रांतीकाराला   पकडले   व   फासावर  लटकवण्यात   आले .
भिल्ल क्रांतिवीर खाज्या नाईक....!!!






Post a Comment

0 Comments