खानदेशातील भिल्लांचा इंग्रजाविरुद्ध लढा .
bhartiyadiwasi.blogspot.com
सदर लेखामध्ये तत्कालीन भिल्ल परिस्थिती चा आढवा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. १९०३ चा दुष्काळ आणि त्यानंतरच्या मराठा आक्रमणाने भिल्ल शेतीपासून दूर फेकले गेले आणि लुटालूट करू लागले याची सविस्तर चर्चा केली आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर एल्फिन्स्टन यांनी कॅप्टन ब्रिग्ज यांची निवड केली. गुमानी नाईक हा पहिला भिल्ल तयार झाला जो सैंदवा पास येथे होता त्यांच्याकडे २३० भिल्ल होते. पुढे १८२१ मध्ये काही भिल्ल पकडले गेले. जवळजवळ २०० कैद करून ठाणे येथे तुरुंगात ठेवले होते. त्यांना माफी करार देऊन सोडून दिले पण खानदेशात परतल्यावर त्यांनी हत्यासत्र आरंभले, ज्यांनी त्यांना पकडण्यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांना मदत केली होती. परत परिस्थिती जैसे थे झाली. कॅप्टन ब्रिगचे ही संघर्षांची वर्णने लिहून ठेवले आहे. शेतीसाठी जमीन व बैलाच्या साठी कर्ज अशी कल्पना १८२४ मध्ये आर्च राबर्टसन्स या कलेक्टरने लढवली आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली.
bhartiyadiwasi.blogspot.com |
0 Comments